Pages

Wednesday, 27 August 2014

जगावं की मरावं हा एकच सवाल


जगावं की मरावं हा एकच सवाल

या दुनियेच्या उकिरडयावर,

खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं, बेशरम, लाचार, आनंदानं की फेकून ध्य़ावं देहाचं लक्तर

त्यात गुंडाळल्या जाणिवेच्या यातनेसह मृत्यूच्या कळ्याशार डोहामध्ये ?

आणि करावा सर्वोचा शेवट एकाच प्रहारानं माझा, तूझा आणि त्याचाही.

मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की

नंतर येणार्या निद्रेला नसावं जागृतीचा किनारा कधीही

पण त्या निद्रेला ही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर ,

तर - तर इथंच मेख आहे .

नव्या स्वप्नाच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून सहन करतो हे जूने
जागेपण

प्रेताच्या निर्जिवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार अस्तित्वाच्या गाभार्यात असलेल्या सत्वाची विटंबना

आणि अखेर करूणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेने आमच्या मारेकराच्याच दाराशी .

विधात्या तू इतका कठोर का झालास एका बाजूला,

आम्ही ज्यानां जन्मं दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसर्या बाजूला,
ज्यानं आम्हाला जन्मं दिला तो तु ही आम्हाला विसरतोस,

मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करूणाकरा,

आम्ही थेरड्यांनी कोणाच्या पायांवर डोकं आदाळायचं !

श्रध्देनं प्रेरित झालेला माणूस स्वार्थ तृणावत पायदली तुडवितो;

पण श्रध्देची हिफाजत प्राणाची बाजी लावूनही करतो.
राजे आणि सिहासंन उभी राहतात,

अक्षय टिकतात ती केवल अफाट संख्येच्या स्वार्थी- आपमतलबी बाजारबूणग्यांच्या सैन्यबलावर नाही

तर ती उभी राहतात -टिकतात सिंहासनाबद्दलच्या श्रध्देच्या अधिष्टानावर आणि आपल्या नेत्याबद्दलच्या

अपार भक्तिभावावर "

~ शापित राजहंस (अनंत तिबिले)



Friday, 22 August 2014

अश्रूंचा शोध



बर्याचदा लोक सुखाचा संबंध हास्याशी जोडतात मात्र मला चेहऱ्यावरच्या हास्यावर नेहमीच शंका येते. अश्रू हा मात्र आयुष्यभराचा सोबती. आनंदाचा अतिरेक झाला तरी अश्रूच मदतीला येतात, दुःखाचा मार पडला तरी यांचीच साथ.

भावना मोकळ्या होतात त्या अश्रूंनी. हास्य हे बनावती मुखवटा घालून बर्याचवेळा येतं. कुणी अतिशय जवळची व्यक्ती कायमची दूर जाताना तिला निरोप देताना ह्या अश्रूंना लपवत मनुष्य हास्याचा मुखवटा घालतो. अनावर झालेल्या सर्व भावनांचा संबंध तुम्ही ह्या खरात पदार्थाशी जोडू शकता. हा पदार्थ जर आयुष्यात नसला तर आयुष्य नक्कीच बेचव होईल. खरात पदार्थाची किमायच अशी आहे की ते लागते अतिशय कमी प्रमाणात, मात्र त्याचं नसणं तो प्रखरतेने जाणवून देतो.

अनेकवेळा लोक हास्याची तुलना गोड पदार्थाशी करतात. मात्र अती गोड झालं तर डाइबीटीस झालेला मी ऐकलाय मात्र अती खारट आपण प्रयत्नपूर्वकही खाऊ शकत नाही आणि योग्य मात्रेत नाही खाल्लंत तर गलगंडही होण्याचा संभाव असतो.


तर राग माणू नका जर कोणी तुमच्या आयुष्यात येऊन तुम्हाला दु:ख देत असेल, उलट त्याचे आभार माना की त्याने तुम्हाला भावना मोकळ्या करण्याचा मार्ग मोकळा करून दिला. आणि तुम्हीही ह्या उपकाराची परतफेड त्याला त्याच पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा – चांगल्या पद्धतीने किंवा तुमच्या पद्धतीने. ;-) 

Friday, 8 August 2014

वसुधा का नेता कौन हुआ? (रश्मिरथी)

-रामधारी सिंह दिनकर (Ramdhari Singh Dinkar)
सच है, विपत्ति जब आती है,
कायर को ही दहलाती है,
शूरमा नहीं विचलित होते,
क्षण एक नहीं धीरज खोते,
विघ्नों को गले लगाते हैं,
काँटों में राह बनाते हैं।
मुख से न कभी उफ कहते हैं,
संकट का चरण न गहते हैं,
जो आ पड़ता सब सहते हैं,
उद्योग-निरत नित रहते हैं,
शूलों का मूल नसाने को,
बढ़ खुद विपत्ति पर छाने को।
है कौन विघ्न ऐसा जग में,
टिक सके वीर नर के मग में
खम ठोंक ठेलता है जब नर,
पर्वत के जाते पाँव उखड़।
मानव जब जोर लगाता है,
पत्थर पानी बन जाता है।
गुण बड़े एक से एक प्रखर,
हैं छिपे मानवों के भीतर,
मेंहदी में जैसे लाली हो,
वर्तिका-बीच उजियाली हो।
बत्ती जो नहीं जलाता है
रोशनी नहीं वह पाता है।
पीसा जाता जब इक्षु-दण्ड,
झरती रस की धारा अखण्ड,
मेंहदी जब सहती है प्रहार,
बनती ललनाओं का सिंगार।
जब फूल पिरोये जाते हैं,
हम उनको गले लगाते हैं।
वसुधा का नेता कौन हुआ?
भूखण्ड-विजेता कौन हुआ?
अतुलित यश क्रेता कौन हुआ?
नव-धर्म प्रणेता कौन हुआ?
जिसने न कभी आराम किया,
विघ्नों में रहकर नाम किया।
जब विघ्न सामने आते हैं,
सोते से हमें जगाते हैं,
मन को मरोड़ते हैं पल-पल,
तन को झँझोरते हैं पल-पल।
सत्पथ की ओर लगाकर ही,
जाते हैं हमें जगाकर ही।
वाटिका और वन एक नहीं,
आराम और रण एक नहीं।
वर्षा, अंधड़, आतप अखंड,
पौरुष के हैं साधन प्रचण्ड।
वन में प्रसून तो खिलते हैं,
बागों में शाल न मिलते हैं।
कङ्करियाँ जिनकी सेज सुघर,
छाया देता केवल अम्बर,
विपदाएँ दूध पिलाती हैं,
लोरी आँधियाँ सुनाती हैं।
जो लाक्षा-गृह में जलते हैं,
वे ही शूरमा निकलते हैं।
बढ़कर विपत्तियों पर छा जा,
मेरे किशोर! मेरे ताजा!
जीवन का रस छन जाने दे,
तन को पत्थर बन जाने दे।
तू स्वयं तेज भयकारी है,
क्या कर सकती चिनगारी है?

Thursday, 7 August 2014

कृष्ण की चेतावनी ~ रश्मीरथी

वर्षों तक वन में घूम घूम
बाधा विघ्नों को चूम चूम
सह धूप घाम पानी पत्थर
पांडव आये कुछ और निखर

सौभाग्य न सब दिन होता है
देखें आगे क्या होता है

मैत्री की राह दिखाने को
सब को सुमार्ग पर लाने को
दुर्योधन को समझाने को
भीषण विध्वंस बचाने को
भगवान हस्तिनापुर आए
पांडव का संदेशा लाये

दो न्याय अगर तो आधा दो
पर इसमें भी यदि बाधा हो
तो दे दो केवल पाँच ग्राम
रखो अपनी धरती तमाम

हम वहीँ खुशी से खायेंगे
परिजन पे असी ना उठाएंगे

दुर्योधन वह भी दे ना सका
आशीष समाज की न ले सका
उलटे हरि को बाँधने चला
जो था असाध्य साधने चला

जब नाश मनुज पर छाता है
पहले विवेक मर जाता है

हरि ने भीषण हुँकार किया
अपना स्वरूप विस्तार किया
डगमग डगमग दिग्गज डोले
भगवान कुपित हो कर बोले

जंजीर बढ़ा अब साध मुझे
हां हां दुर्योधन बाँध मुझे

ये देख गगन मुझमे लय है
ये देख पवन मुझमे लय है
मुझमे विलीन झनकार सकल
मुझमे लय है संसार सकल

अमरत्व फूलता है मुझमे
संहार झूलता है मुझमे

भूतल अटल पाताल देख
गत और अनागत काल देख
ये देख जगत का आदि सृजन
ये देख महाभारत का रन

मृतकों से पटी हुई भू है
पहचान कहाँ इसमें तू है

अंबर का कुंतल जाल देख
पद के नीचे पाताल देख
मुट्ठी में तीनो काल देख
मेरा स्वरूप विकराल देख

सब जन्म मुझी से पाते हैं
फिर लौट मुझी में आते हैं

जिह्वा से काढती ज्वाला सघन
साँसों से पाता जन्म पवन
पर जाती मेरी दृष्टि जिधर
हंसने लगती है सृष्टि उधर

मैं जभी मूंदता हूँ लोचन
छा जाता चारो और मरण

बाँधने मुझे तू आया है
जंजीर बड़ी क्या लाया है
यदि मुझे बांधना चाहे मन
पहले तू बाँध अनंत गगन

सूने को साध ना सकता है
वो मुझे बाँध कब सकता है

हित वचन नहीं तुने माना
मैत्री का मूल्य न पहचाना
तो ले अब मैं भी जाता हूँ
अंतिम संकल्प सुनाता हूँ

याचना नहीं अब रण होगा
जीवन जय या की मरण होगा

टकरायेंगे नक्षत्र निखर
बरसेगी भू पर वह्नी प्रखर
फन शेषनाग का डोलेगा
विकराल काल मुंह खोलेगा

दुर्योधन रण ऐसा होगा
फिर कभी नहीं जैसा होगा

भाई पर भाई टूटेंगे
विष बाण बूँद से छूटेंगे
सौभाग्य मनुज के फूटेंगे
वायस शृगाल सुख लूटेंगे

आखिर तू भूशायी होगा
हिंसा का पर्दायी होगा

थी सभा सन्न, सब लोग डरे
चुप थे या थे बेहोश पड़े
केवल दो नर न अघाते थे
ध्रीत्रास्त्र विदुर सुख पाते थे

कर जोड़ खरे प्रमुदित निर्भय
दोनों पुकारते थे जय, जय

Wednesday, 6 August 2014

रष्मिरथी - रामधारी सिंघ दिनकर

बऱ्याच कलावधि नंतर आज लिहायला घेतलय.  मध्ये २ महिने मी जपानला गेलो असल्याने लिहिण्यास तसा वेळ मिळाला नाही. वेळ न मिळाला  म्हणण्यापेक्षा , लिहिण्याची तशी स्फुर्तीच आली नाही. सध्या मी रामधारी सिंघ दिनकर ह्या हिंदीतील अतिशय महान कवीचं “रष्मिरथी” हे कर्णाच्या जीवनावर आधारित काव्य वाचतो आहे. हे फक्त एक महान व्यक्तीच्या झालेल्या कुचाम्बनेला, त्याच्या व्यथेला मध्यभागी ठेवून लिहिलेलं महाकाव्य नाहीय, तर एक उत्कृष्ठ असं कर्णाचं तत्वज्ञान एक वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न आहे. ह्या ब्ला‍‍‍‍ग मध्ये मला आवडलेला एक भाग मी देणार आहे.

आपल्याला सर्वांना पांडवांना लाक्षागृहात मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, हि कथा माहित आहे. ह्या कथेतला तुम्हाला कदाचीत माहित नसलेला भाग मी जरा सांगतो म्हणजे पुढील काव्याचा अधिक बोध होईल.

संपूर्ण लाक्षागृश आगीच्या ज्वालांनी भरून गेलेलं असत. पांडव बाहेर निघत असताना त्यांच्या द्वारात एक सर्प पडलेला असतो. ती गरोदर सर्पिण असते. तिचा प्रसव जवळ आलेला असल्याने तिला हालचाल करणे अतिशय कठीण असते. अशा वेळी अर्जुन तिला मार्गातून दूर करण्यासाठीं आपल्या बाणाच्या टोकावर तिला पकडून आगीत भिरकावतो. ती हवेत असताना तिला प्रसव होतो आणि तो साप नवजात साप खाली पडून बचावतो. मात्र ती सर्पिण आगीच्या भक्षस्थळी पडते. अर्जुनाने आपल्या मातेला मारलेलं तो नवजात सर्प पाहतो आणि त्या क्षणापासून तो अर्जुनाचा वध करण्याची आकांशा बाळगून असतो.


जेव्हा महाभारतात अर्जुन आणि कर्णाचं युद्ध सुरु असतं, तेव्हा हा मोठा झालेला सर्प (अश्वसेन) कर्णाच्या भात्यात येऊन बसतो. त्यांच्या महाभयानक युद्धात अनेक विनाशकारी अस्त्रांचा वापरामुळे संपूर्ण परिसरात अग्नीशलाका पसरलेल्या असतात. तेव्हा हा सर्प कर्णाला विनंती करतो कि, हे कर्ण, तू मला तुझ्या बाणावर आरूढ होऊ दे आणि फक्त मला पार्थाच्या रथापर्यंत पोहचाव, मी त्याचा वध करतो. आज पर्यंत जीतकं विष मी जमवलय, ते सर्व आज मी त्याच्या देहात उतरवतो. तेव्हा कर्ण जे उत्तर त्या सर्पाला देतो, ते उत्तर मला फार भावलं. ह्या प्रसंगातला भाग मी इथे देतोय.


इतने में शर के कर्ण ने देखा जो अपना निषङग,

तरकस में से फुङकार उठा, कोई प्रचण्ड विषधर भूजङग,

कहता कि "कर्ण! मैं अश्वसेन विश्रुत भुजंगो का स्वामी हूँ,

जन्म से पार्थ का शत्रु परम, तेरा बहुविधि हितकामी हूँ.



"बस, एक बार कर कृपा धनुष पर चढ शरव्य तक जाने दे,

इस महाशत्रु को अभी तुरत स्यन्दन में मुझे सुलाने दे.

कर वमन गरल जीवन भर का सञ्चित प्रतिशोध उतारूंगा,

तू मुझे सहारा दे, बढक़र मैं अभी पार्थ को मारूंगा."



राधेय जरा हंसकर बोला, "रे कुटिल! बात क्या कहता है ?

जय का समस्त साधन नर का अपनी बांहों में रहता है.

उस पर भी सांपों से मिल कर मैं मनुज, मनुज से युध्द करूं ?

जीवन भर जो निष्ठा पाली, उससे आचरण विरुध्द करूं ?"



"तेरी सहायता से जय तो मैं अनायास पा जाऊंगा,

आनेवाली मानवता को, लेकिन, क्या मुख दिखलाऊंगा ?

संसार कहेगा, जीवन का सब सुकृत कर्ण ने क्षार किया;

प्रतिभट के वध के लिए सर्प का पापी ने साहाय्य लिया."



"हे अश्वसेन! तेरे अनेक वंशज हैं छिपे नरों में भी,

सीमित वन में ही नहीं, बहुत बसते पुर-ग्राम-घरों में भी.

ये नर-भुजङग मानवता का पथ कठिन बहुत कर देते हैं,

प्रतिबल के वध के लिए नीच साहाय्य सर्प का लेते हैं."



"ऐसा न हो कि इन सांपो में मेरा भी उज्ज्वल नाम चढे.

पाकर मेरा आदर्श और कुछ नरता का यह पाप बढे.

अर्जुन है मेरा शत्रु, किन्तु वह सर्प नहीं, नर ही तो है,

संघर्ष सनातन नहीं, शत्रुता इस जीवन भर ही तो है."



"अगला जीवन किसलिए भला, तब हो द्वेषान्ध बिगाडं मैं ?

सांपो की जाकर शरण, सर्प बन क्यों मनुष्य को मारूं मैं ?

जा भाग, मनुज का सहज शत्रु, मित्रता न मेरी पा सकता, 


मैं किसी हेतु भी यह कलङक अपने पर नहीं लगा सकता




Saturday, 14 June 2014

तत्कालची रांग.

ह्या तत्काळच्या रांगेच्या अनेक गमती-जमती असतात.जर खरी exitement म्हणजे काय हे जर तुम्हाला अनुभवायचं असेल, तर ह्या रांगेत तुमचं स्वागत आहे.पहिल्या दहा क्रमांकानंतर जर तुम्ही उभे असाल तर मग नास्तिकालाही देव आठवतो. खेद, आनंद, वैषम्य, उत्तेजीतपणा, हुरहूर असल्या अनेक भावनांचं दर्शन ह्या अर्ध्या तासात होतं.जर प्रवास लांबचा असेल तर मग संपूर्णवेळ धाकधुक.

यातही गंमत अशी की जर तिकीट काढणारा व्यक्ती की-बोर्ड शी खेळण्यात पटाइत असेल तर ठीक, नाहीतर मग पंचाईत आहेच. कारण तुम्ही रागही करू शकत नाही, नाहीतर ज्या वेगाने करतोय तोही थांबायचा.
माझ्यासोबत हि गोष्ट नेहमी घडते. आमच्या खरगपूरचा तत्काळच्या वेळात बसणारा व्यक्ती डबल भिंगाचा चष्मा असलेला. म्हणजे काय होतं, तो हातातला फॉर्म वाचणार खालच्या भिंगाने आणि कॉम्पुटरच्या स्क्रीनमधे पाहणार वरच्या भिंगाने आणि मधली वेळ त्याची नजर स्थिर होण्यासाठी. त्यामुळे माझा नंबर पहिल्या दहामधे जरी असला तरी पूर्णवेळ धाकधूक असते. कामाचा उरकही कमी वरून, चिडचिड फार. ट्रेनचा नंबर माहित करून घेता येत नाही का, ओळखपत्रावर सही काय मी करणार, सुटे पैसे आणता येत नाही का, एक न अनेक भानगडी तो करणारच.

याच्या अगदी उलट माझ्या hometownला असणाऱ्या मॅडम. ह्या कॉम्पुटर आणि पैशाच्या हिशोभात अतिशय तरबेज. सतत हसतमुख आणि मदतीला तैय्यार. खांद्यापर्यंत मोकळे केस, केसांना बेल्ट लावलेला आणि सलवार-कमीज घातलेल्या चाळीशीतील बाई. तिथे असताना आपलंकाम होईल हि बर्यापैकी खात्री.

जर तुम्ही मनात असतं की शुभशिर्वादांनी कोणाला दीर्घायुष्य लाभतं किंवा कुणाच्या शिव्याशापांनी कुणाचं आयुष्य कमी होत, तर दोघींपैकी एकाला बह्र्पूर आयुष्य आणि दुसर्याचे काहीच वर्ष उरलेत अशी अवस्था आहे.

मला कळत नाही हे लोक बँकेमधे किंवा रेल्वे-काऊँटर वर म्हाताऱ्या लोकांना का म्हणून बसवतात? आधीच आपली लोकसंख्या अशी आहे की प्रत्येक ठिकाणी रांगच रांग. वरून ह्या म्हाताऱ्या माणसांची कॉम्पुटरशी ओळखही मर्यादितच. त्यांना त्यांच्या ठराविक कामापेक्षा वेगळी काही शंका विचारली की ते गडबडनारच. मग काय हि ब्याद म्हणून बर्याचवेळा चिडणार, काहीतरी नियम दाखवून आपली गच्छंती करणार.

तिकीट confirm आहे हे कळल्यावर जो हर्षतीशयाने चेहरा खुलतो, तो तर अवर्ननियच. बऱ्याचवेळा आपल्या अगदी पुढच्या मनुष्याचं तिकीट confirm मिळालं आणि आपल्या तिकिटावर waitingचा शिक्का लागला म्हणजे मग आपण आपल्या नशिबाला दूषणं लावणार हे नक्की. जर-तर च्या फैरी मनामध्ये झडणार. म्हणजे जर मी अजून १५ मिनिट लवकर गेलो असतो तर मला confirm तिकीट मिळालं असतं.

ज्यांना तत्काळ काढण्याचा कधी अनुभव आला नाही अशा भाग्यवंतांना हि गोष्ट माहित नसावी कि हि रांग म्हणजे काही जिवंत माणसांची रांग नसते काही पूर्णवेळ. सर्वात पहिले जो मनुष्य आला त्याने आपलं नाव एका कागदावर लिहावं आणि पुढचा कोणी आला की तो त्यानंतर नाव लिहिणार. मग पहिला दुसर्याला त्या कागदाची राखवालदारी करायला बसवून कुठेतरी फिरायला निघून जाणार, असा क्रम चालूच राहणार.  खरी जिवंत हाड-मांस असणार्यांची रांग लागते ती सकाळी ९:३० वाजता. मग खरी गंमत चालू होते. जे तिथे पूर्णवेळ उभे होते पण ज्याचं त्या कागदावर बराच खालचा क्रमांक आहे अश्या लोकांचा वेगळाच जळफळाट असतो. शेवटी त्यापैकी एखाद्याचा संयम सुटतो आणि तो बंड करून उठतो. पण त्याला घालवण्यासाठी सर्वलोक अगदी एकजूट करतात आणि त्याला हुस्कवतात. मग तो तोंडात बडबड करतच तिथून निघतो. हा उपक्रम अगदी ठरलेला.

ज्यांना हा अनुभव आलेला नाहीय त्यांनी तो एकदा जरूर घ्या. जीवनातले सर्व रस अगदी कमी वेळात ग्रहण करण्याचं हमखास स्थान म्हणजे- तत्कालची रांग.        

Saturday, 26 April 2014

उदोउदो अथवा लाथा

हे लिहायला आता तसा फार उशीर झालाय, मात्र परीक्षा असल्यामुळे तेव्हा काही लिहायला जमलं नाही. तेव्हा उशिरा का होईना मात्र हे लिहिणं मला गरजेचं वाटतंय. श्रीलंकेविरुद्ध फायनल मॅचमधे युवराज सिंगचं चांगलं प्रदर्शन झालं नाही म्हणून तुम्ही दगड मारणार त्याच्या घरावर? काही वर्षांपूर्वी कैफचा फॉर्म गेला आणि त्याच्या घरावर डांबर फासलं.




शहीद आफ्रिदी काही वर्षांपूर्वी म्हणाला होता की, आमच्याकडच्या लोकांना फक्त दोनच अवयव आहेत- डोकं आणि पाय. जर मैदानावर चांगला खेळलो तर हे लोक डोक्यावर घेवून उदोउदो करतात आणि जर थोडा फॉर्म बिघडला तर हेच लोक पायाने लाथा घालण्यासही कमी करत नाहीत. तो जे म्हणाला ते आपल्या भारतातल्या लोकांनाही लागू होत नाही का?
खेळात कोणी जिंकणार कोणी हरणारच. मला तुम्हाला दु:ख होणं साहजीकच आहे भारत हरला तर. म्हणून काय तुम्ही मागच्या सर्व गोष्टी विसरून त्याला दोषी मानणार. जेव्हा वर्ल्डकप जिंकला तेव्हा तुम्हीच त्याला डोक्यावर घेवून नाचला होतात, ते लगेच विसरलात का?

अहो जर दगड मारायची इतकीच मस्ती येते तर आजम खान, अबू आझमी सारखे लोक वाच्चाळ गोष्टी करतात तेव्हा त्यांच्या घरावर का मारत नाहीत? अकबरुद्दिन औवेसी सारखा मनुष्य हिंदू-मुस्लिमांना एकमेकांशी लडवन्याच्या गोष्टी करतो तेव्हा का त्याच्या घरावर दगडफेक करत नाहीत? देश विभागनीची आणि समाजा-समाजात ताणताणाव निर्माण करणारी भाषणे निर्माण करणार्यांच्या घरावर का दगड मारत नाहीत? पण नाही. तुम्ही ते मात्र करणार नाहीत. तुमच्या नेत्याच्या विरुद्ध कोणी अपशब्द बोलला तर मात्र तुम्ही शाई, चपला आणि अंडे घेऊन येतात.

संयम नावाचा पदार्थ कशासोबत खातात हे आपल्याला कुठे माहित आहे. नाही का?

Friday, 4 April 2014

भगवंताचे मनोगत

आम्ही आपल्याला काही चमत्कार दाखवू या आशेने आपण सगळे माझ्याकडे धावत आलात. आम्ही काही बोललो तरी त्यातून तुम्ही अनेक अर्थ काढतात आणि कीर्तीचा नगारा वाजवीत चारी बाजूला फिरता. या सगळ्या गोष्टी ऐकून दुसरे अनेक लोग माझ्याकडे येतात. अनेक प्रश्न विचारतात. आम्ही जे उत्तर देतो त्यातून आपल्या बुद्धीनुसार नवा अर्थ काढतात व पुस्तके बाहेर काढतात.

या साऱ्या पुस्तकांचा अभ्यास केल्यावर आता आम्ही असे मानायला लागलो आहोत की, चमत्कार दाखवण्याची शक्ती अमच्यापेक्षा तुमच्यात जास्त आहे. कारण आम्ही जे सांगितले ते या पुस्तकांमध्ये नाही. आमच्या नवे तुम्ही हे सारे जगात चालवले आहे तो काय लहान चमत्कार आहे?

एक दिवस मी ध्यानस्थ बसलो होतो. आपण माझ्या दर्शनासाठी आला होतात. त्यावेळी माझ्या कपळी धुळीचा डाग होता. तो पाहून आपण सारे विचार करू लागलात व आपापसात म्हणू लागलात की, ‘गुरुदेवांच्या कपाळावरचे हे चिन्ह पवित्र आहे. आज काही नवीनच आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही सारे कपाळी टिळा लावायला लागलात व इतरांनाही असे सांगायला लागलात की, ‘गुरुदेव असे करतात म्हणून आपणही असे केले पाहिजे.’

परिणाम असा झाला की, तुम्ही मंडळींनी कपाळावर टिळा लावायचे अनेक प्रकार शोधून काढलेत. याविषयी मला कोणी विचारले नाही आणि मी असे करण्याची आज्ञा दिली असे सांगून याचा प्रचार केला. इथेच हा प्रकार थांबला असता तर बरे, पण तुम्ही लोक तर माझ्या कपाळावरही टिळा लावायला लागलात.

हे सारे पाहिल्यावर वाटते की चमत्कार करण्याची शक्ती तुमच्यात जास्ती भरलेली आहे.
एके दिवशी कोणी मला प्रणाम करायला आले होते. प्रणाम करताना त्याच्या खिशातून पैसे पडले. आपण सगळे येऊन म्हणालात: ‘वा:! आज गुरुदेवांनी नवा मार्ग दाखवला. त्यांच्या चरणी पैसे ठेवले पाहिजेत.’ मग तुम्ही सगळे पैसे ठेवायला लागलात. त्या पैशाची व्यवस्था ठेवण्यासाठी तुम्ही लोकांनी एक मंडळ स्थापन केले.

माझी कीर्ती तुम्ही वाढवीतच राहिलात. पैसे जमवितच राहिलात. एके दिवशी मी ध्यानातून उठलो आणि एक नवीनच प्रकार पहिला. माझ्याभोवती चौफेर अंधार पसरला होता. तपास करता कळले की, माझ्या आसपास घर रचण्यात आले आहे. थोड्या वेळात घंटानाद ऐकू यायला लागला व नंतर दरवाजे उघडण्यात आले. एक पुजारीही होता. तो जमलेल्या लोकांना म्हणाला:
‘भगवान जागे झाले आहेत. दर्शन घायचे असेल तर घेऊन टाका.’ सर्वांनी दर्शन घेतले. आता असे झाले आहे की, तुम्ही ज्याला मंदिर म्हणता त्यात मी बंदिवान आहे. मी केव्हा उठावे हे सारे तुम्हीच ठरवता.
हे सगळे पाहिल्यावर तुम्हीच सांगा, माझ्यापेक्षा चमत्कार करण्याची शक्ती तुमच्यात कमी आहे?

 ~"प्रभातपुष्प" मधील उतारा.

Friday, 21 March 2014

राम आणि युधिष्ठीर


राम –मर्यादापुरुषोत्तम, आज्ञाधारक मुलगा, महान योद्धा, उत्तम राजा, प्रजेचा लाडका.
युधिष्ठीर –धर्माच्या आचरणात कधीही कसूर न करणारा.
असे जगावेगळे सर्व गुण असताना मला खटकते ती एक गोष्ट. दोन्हींनी आपल्या स्री वर अन्याय केला. धर्माच्या दृष्टीने तुम्ही कितीही वादविवाद करून तुमची बाजू मांडा, पण मला दोन्ही स्रीयांवर अन्याय झाल्यासारखा वाटतो.

का म्हणून मार्यादापुरुषोत्तम रामाने सीतेला अग्निपरीक्षेतून जायला लावलं? मुळातच रामाचा जर कोणावर जास्त विश्वास होता, ती होती सीता. त्याला मुळातच तिच्यावर काडीमात्र संशय नव्हता. पण माझा प्रश्न हा आहे की, का म्हणून समाजाच्या होऊ शकणार्या उपेक्षेला राजा भ्यायला? का म्हणून सर्वांचा आदर्श असलेल्या रामाने सीतेला अग्निदिव्यातून जायला लावले? एवढयावरच गोष्ट संपली असती तरी मी मानली असती तुमची बाजू. मात्र पुन्हा सीतेचा त्याग. त्याही एका यःकिंचित धोब्याने उत्पन्न केलेल्या शंकेमुळे?

मुळातच गोष्ट अशी होती, की हि शंका एका धोब्याची नव्हती. तसं असतं तर राम काही सीतेचा त्याग करणारा नव्हता. तर सर्व जनता ह्या गोष्टीविषयी लपून चापून चर्चा करताच होती. राजाचा धर्म आहे की अशा प्रत्येक गोष्टीचा नाश करा ज्यामुळे राजगादिच्या प्रतीष्ठेची हानी होत असेल. कारण राजगादीचा आदरयुक्त धाकच नसेल तर अनागोंदी माजते. आणि या बाबतीत सीता नकळत ती गोष्ट होती.

राम हा आदर्श राजा आणि पतीही होता. त्याने घेतलेला हा निर्णय काही एका क्षणात नव्हता; की ऐकलं धोब्याकडून आणि केला त्याग. त्याच्या मनात फार मोठं द्वंद्व सुरु होतं.राजा राजधर्माच पालन करण्यास सांगत होता आणि पती विरोध करत होता. पण द्वंद्वाचा निकाल एकाच असतो –विजय किंवा मृत्यू. त्यात मध्यममार्ग हा असा काही नसतोच. ह्या द्वंद्वात पती हरला आणि द्वन्द्वाच्या निकालाप्रमाणे राजा जिंकला. पण राजा जिंकला असं तरी कसं म्हणावं?

माझा आक्षेप हा आहे की ह्या द्वंद्वात राजा जिंकलाच कसा? सीता पवित्र आहे हे माहित असूनही राजा का लोकचर्चेला भ्याला? सीता त्याची प्रजा नव्हती का? डोळ्यांसमोर अन्याय दिसत असूनही कर्तव्यतत्पर राजा शांत कसा? पतीचा धर्म तरी राजा कसा विसरला? आपल्या स्रीचं मरेपर्यंत रक्षण करण्याच्या क्षपतेच काय?
पण ह्या बाबतीतही सीतेने रामाची साथ काही सोडली नाही.त्यांच्या नात्याची खोलीच अशी काही होती.ती राम दुसरं लग्न करणार नाही ह्या विषयी निश्चिंत होती. रामाने गरोदर स्रीला वनवासात पाठवण्याचा निर्णय मात्र मी पचवू शकत नाही.

त्यानंतर घ्या युधीष्टीरचं उदाहरण. जुगार खेळण्यात कसला आलाय धर्म? आणि सर्व गोष्टी हरल्यावर शकुनीने द्रौपदीला डावावर लावण्याच्या गोष्टीला युधिष्टीराने परवानगी का म्हणून दिली? हे कोणत्या धर्मात सांगितलं होतं? जेव्हा तो स्वतः डावात हरला होता, म्हणजे तो कौरवांचा दास झाला होता, मग त्याला द्रौपदीला डावावर लावण्याचा हक्क तरी कुठे होता? धर्म धर्माला कसा विसरला?

जुगाराचा नाश त्याला ह्या पातळीवर नेतो, तर त्याला मी धर्म तरी का म्हणावं? का म्हणून त्याने भीमाला आवर घातला द्रौपदी वस्त्रहरण होत असताना? युधिष्ठीर त्या क्षणी खरंच धर्माचं आचरण करु इच्छित होता की स्वतःच्या ‘धर्म’ ह्या प्रतीष्ठेला सांभाळत होता?

त्या परिस्थितीत योग्य आचरण असं कोणी केलाच नाही.मग तो फक्त युधिष्ठिराच नव्हता, भीष्मपीतमह, द्रोणहि, धृतराष्ट्र आणि इतर सभागृहातली मंडळीही आणि द्रौपदीही तितकीच चूक होती. का त्या क्षनातही द्रौपदीचा वृथा अभिमान सुटला नाही? एका हाकेची गरज असलेल्या कर्णाची तू त्या स्थितीतही अवहेलना केलीस. दानवीर म्हणवणाऱ्या कर्णा, तू तरी त्या हाकेसाठी का विसंबून राहिलास? तुझ्या मदतीच्या दानापेक्षा श्रेष्ठ दान अजून काय झाले असते? ती ‘सूतपुत्र’ म्हणून मदत नाकारेल हीच काय रे तुझी भीती होती?

द्रौपदीवर त्या सर्वांचा अधिकार नव्हता म्हणून त्यांना नजरेआड करणं एकवेळ शक्य आहे. मात्र युधिष्ठिर, तू घोर उपेक्षा केली.का तूच एकटा स्वर्गाच्या दारात जीवन्तपनी गेलास? देवालाही तू जे वागलास ते मान्य होतं, असं म्हणायचं का?

~दिग्विजय संजय पाटील
                                                                                         

Thursday, 13 March 2014

हृदयापर्यंत पोहोचण्याचे मार्ग...


लहानपणापासून राजकीय नेत्यांना, त्यांच्या लाखोंच्या संख्येने असलेल्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या उत्साहाला, नेत्यांच्या गाडीभोवतीच्या प्रचंड ताफ्यांना पाहून मला नेहमीच अचंबा वाटत आला आहे. ही असली कोणती गोष्ट आहे जी लाखोंना वेड लावते? का काही मोजक्या मंडळींसाठी आपापसातील मित्र भांडण करतात आपला नेता श्रेष्ठ ठरवण्यासाठी?

गेल्या १० वर्षात अनेक राजकीय नेत्यांचा उदयास्त पाहायला मिळाला. बऱ्याच नेत्यांचा प्रभाव गरजेपेक्षा वाढत गेला तर काही राजकीय क्षितिजावरून दिसेनाशी झाली.

नेता बनण्यासाठी काही उदिष्ठ, मुद्दा असो अथवा नसो, मी पुढे सांगणार असलेल्या गोष्टींपैकी एक तर असणे अतीशय गरजेचे आहे. तर तुम्ही विचार करत असणार हा काय नवीन सांगणार? तर त्या गोष्टी आहेत –खिसा आणि गळा.

मतदानाच्या राजकारणात लोकांची हृदये जिंकायची असल्यास दोन मार्ग आहेत, एक तर पोटाच्या बाजूने किंवा गळ्याच्या बाजूने. ज्यांच्याकडे पैसा आहे, परिवार आहे अशी माणसे पोटामार्गे जाण्याचा रस्ता पसंत करतात. मतितार्थ हा की मते मिळवायची असल्यास पहिले लोकांची पोटे जिंकली पाहिजेत, नाही का? आपल्याकडच्या लोकांच्या अपेक्षाही फार छोट्या आणि तात्पुरत्या आहे हो! फसवली जातात म्हणण्यापेक्षा विकली लवकर जातात. पण त्यांचा एका गुणाची दाद द्यायला हवी. त्यातली बरीचशी माणसे फार इमानदार असतात. खाल्ल्या मिठाला जागतात ती!

आता दुसर्या मार्गातर्फे जाणाऱ्यांकडे पाहूया. ज्यांचा खिसा खाली आहे, त्यांना तोंडामार्फत जाण्याशिवाय पर्याय नसतो, म्हणजे भाषणे देऊन, लोकांच्या भावना चेतवून.(भडकावून म्हणायचं होत मला इथे) सामान्य जनतेला असे तिचे स्वतःचे फार काही विचार किंवा तत्व नसतात. त्यांचे विचार आणि तत्व शाबूत आणि भक्कम आहे अशी त्यांची भाबडी समजूत मात्र नक्की असते. कोणीतरी येतं आणि उत्कृष्ठ भाषाशैलीत चार गोष्टी काय सांगतो आणि यांची मते लगेच बदलतात. शेक्सपिअरने ह्या लोकांच्या वृत्तीच अतिशय नेमकं चित्रण ज्युलियस सीझर या महान नाटकात केलाय. सीझरच्या हत्येच्या कटकर्त्यांच्या प्रभावाखाली आलेली जनता सीझर किती वाईट आणि घातक होता ही चर्चा करत होती. काही क्षणात मार्क अंटोनीने सीझरच्या समर्थनार्थ दिलेल्या उत्कृठ भाषणाच्या प्रभावाखाली येऊन तीच जनता कटकर्त्यानाही मारायला धावली. हीच लोकांची धमनी ह्या लोकांनी ओळखलीय.

शेवटी अपेक्षेपेक्षाहीपुढे पुढे तेच जाताना दिसतात ज्यांचा खिसाही भरलेला आहे आणि कंठही दृढ आहे, नाही का?


~दिग्विजय पाटील.

Tuesday, 11 March 2014

चूक की अनुभव?



जग चुकते, त्या चुकीविषयी ऐकते, पण शिकत मात्र नाही! प्रत्येक मनुष्य आयुष्याच्या शेवटी शहाणा होतो, पण तो दुसर्याला लागलेल्या ठेचांनी नाही तर स्वतःला झालेल्या जखमांनी!

तसं पाहिलं तर आयुष्य फार छोटं आहे जगातल्या सर्वच चुका स्वतःच करण्यासाठी आणि त्यातून शिकण्यासाठी. जी मानसं दुसर्याच्या ठेचांनी शिकतात, ती शहाणी ठरतात आणि जी म्हणतात की, 'स्वतःच्या अनुभवातून आलेलं ज्ञान सर्वश्रेष्ठ' ती अंगभर अनुभवाच्या जखमा घेऊन वावरतात.

'चुकांमधून अनुभव' हा शब्दच मुली मला स्वतःची समजूत काढण्यासाठी मढवलेला वाटतो , कारण त्याच्याशी जोडलेल्या असतात वाईट आठवणी. जीवनातल्या वाईट प्रसंगांना 'अनुभव' हे गोंडस नाव देऊन तेवढाच आपण मनाला दिलासा देण्याचा प्रयत्न करतो.

मला सांगा कितीतरी मानसं आपल्या 'अनुभवातून' शिकून त्याच चुकीची पुनरावृत्ती करत नाहीत? फार क्वचित मानसं हो! बाकी लोकांच संपूर्ण आयुष्याच 'अनुभवांनी' भरलेलं असतं.

वेळ निघून गेल्यानंतर आलेल्या शहाणपणाची किंमतच मुळी फार कमी असते आणि जी थोडीफार असते, तिचा उपयोग तेव्हाच जेव्हा पुढच्या वेळी आपण तिचं स्मरण ठेवतो.

आपण फार विसराळू आहोत हो! कालांतराने विसरतो गोष्टी. पण चुकांना 'अनुभव' नावाचा सन्मान मिळवून द्यायचा असेल तर विसराळू होऊन काम कसे चालेल?

लहानपणपासून मनावर बिंबवल जातं की वाईट गोष्टींना विसरा, चांग्ल्यावर लक्ष केंद्रित करा. मात्र काही चांगल होण्याची अशा बाळगत असाल तर वाईट गोष्टींमधून जो 'पाठ' घेण्याची आपण मनाला तात्पुरती दिलेली समजूत असते ती तात्पुरती ह्या सदरातून आपल्याला वगळायला हवी, नाही का?

~दिग्विजय पाटील.

प्रेमयोग (Premyog) ~ कुसुमाग्रज


प्रेम कुणावरं करावं?....कुणावरही करावं
राधेच्या वत्सल स्तनावर करावं
कुब्जेच्या विद्रुप कुबडावर करावं
भीष्मद्रोणाच्या थकलेल्या तीर्थरुप चरणांवर करावं
दुर्योधन कर्णाच्या अभिमानी,अपराजित मरणांवर करावं
प्रेम कुणावरही करावं.....



सुदामा नावाच्या भटजीवर करावं
अर्जुन नावाच्या राजेन्द्रावर करावं
बासरीतुन पाझरनार्या सप्तस्वरांच्या चांदण्यावर करावं
यमुनेचा डोह जहरुन टाकणार्या कालियाच्या फण्यावर करावं
प्रेम कुणावरही करावं



रुक्मीनिच्या लालस ऒठावरं करावं
वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं
गाईच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं
मोराच्या पिसार्यातील अद्भुत लावण्यावर करावं
प्रेम काळजाच्या नात्यावर करावं
आणी
खङगाच्या पात्यावर कराव
प्रेम कुणावरही करावं



प्रेम गोपींच्या मादक लीलांवर करावं
पेंद्याच्या बोबड्या बोलावर करावं
यशोदेच्या दुधावर....देवकीच्या आसवांवर करावं
प्रेम बलरामाच्या खांद्यावरील नागराच्या फाळावर करावं
कंसाच्या काळजातील द्वेषाच्या जाळावरं करावं
ज्याला तारायचं...त्याच्यावर तर करावंच ,
पण ज्याला मारायचं,त्याच्यावरही करावं
प्रेम कुणावरही करावं



प्रेम योगावर कराव..प्रेम भोगावर करावं
आणी त्याहुन अधिक त्यागावर करावं
प्रेम चारी पुरुषा्रथाची झींग देणा्रया जीवनाच्या द्रवावर करावं
आणी पारध्याच्या बाणांनी घायाळ होवुन
अरण्यात एकाकी पडणार्या स्वताच्या शवांवरही करावं
प्रेम कुणावरही करावं कारण,
प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश
त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष
आणी...
भविष्यकाळातील त्याच्या अभ्युदयाची आशा ऎकमेव..............

~कुसुमाग्रजं

Monday, 10 March 2014

उपहास

भारतात ३ उत्सव फार मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात - लग्न,वर्ल्डकप क्रिकेट आणि निवडणुका. त्यातल्यात्यात निवडणुकांचा वारा लागताच आपली जनता बेभान होते. एरवी शांत असणारी, कोणत्याही बाबतीत जे चाललंय तेच चालू देणारी, बदल ह्या शब्दालाही घाबरणारी मंडळी निवडणुका येताच त्यांच्यात एक निराळच चैतन्य दिसून येत. कदाचित तेच चैतन्य संचारल्यामुळे मी हे लिहतोय.

राजकारणात नेहमीच असे घडत आले आहे - संघर्ष वरकरणी दिसतो वैचारीक, तसा तो काही प्रमाणात असतोही. त्याचबरोबर त्याला वैयक्तिक रागलोभाचेही परीणाम लाभलेले असतात. नव्हे, मुळात तोच त्याचा गाभा असतो. कोणी त्याची कबुली देत नाही, इतकेच काय ते.




महाराष्ट्राच्या राजकारणात ह्या ठळक ओळींना काही विशेषच महत्त्व आहे. काही वेगळी विचारधारा घेऊन राजकीय पक्ष जन्म घेतात, हि आता वेडगळ समजूत झालीय. स्वतःच्या वैयक्तिक महत्वाकांक्षांचे पंख पसरवण्यासाठीही ते जन्म घेतात, मात्र त्याच बाबतीत आपली गल्लत होते. आणि काही काळाने कळत की ज्याला आपण नवी आशा म्हणून पाहत होतो, तोही राजकारणाच्या सरबतात विरघळलाय. मात्र हे समजण्यापूर्वी फार उशीर झालेला असतो.

अमेरिकेच्या राजकारणात पहा, तेथे दोनच पक्षाचं वर्चस्व आहे- डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन. किंवा इंग्लंडमधेही पहा- conservative unionist आणि labour पक्ष. भारतात सर्वात मोठा प्रश्न हा आहे की सत्तेसाठी आवश्यक निम्म्याहून अधिक संख्याबळ जमवण कोणत्याही एका पक्षाला शक्य नाही. मग ते मिळवण्यासाठी अतिशय विरुद्ध विचारधारणा असणारे पक्ष एकत्र येतात, आणि राजकीय संतुलन ढळत. राजकारण विचारधारेपासून व्यक्तीत्वाकडे जेव्हा कलणं सुरु करतं तेव्हा ते राजकारण उरत नाही, तेव्हा ते बनत सत्तारूढ होण्यासाठी इच्छुक व्यक्तींचा आपापसातील संघर्ष.

परिस्थितीवर स्वार होण्यासाठी अहंमन्य नेत्यालाही आपली पहिली कार्यशैली सोडून द्यावी लागते.हि सुध्दा गोष्ट प्रामुख्याने दिसून येते. एकेकाळी कुणा एका समूहाचे रक्षणकर्ते म्हणवणारे, मतदाराचा कल पाहत निवडणुकीपूर्वी आपल्या भूमिकांना U-टर्न देतात. अहो पण घोषणापत्रात(manifesto) तुम्ही काहीही लिहील तरी माणूस बदलतो काय? मानसन्मान मिळवण्यापेक्षा समाजाच्या आदरास पत्र होण अधिक श्रेयस्कर असतं, हे हि मंडळी विसरतात. सत्ताअभिलाषा किंवा राज्यतृष्णा मनुष्याला आंधळ करते हि म्हण काही खोटी नाही.

भावना भडकावणारी भाषणं करण किंवा मोर्च्याच्या अग्रभागी असणं म्हणजे नेतृत्व नव्हे, तर त्या भाषणाचा किंवा त्या मोर्च्याचा उद्देश निर्मळ असणं आणि ज्या लोकांची उर्जा त्या गोष्टीसाठी खर्च होतेय त्या लोकांच्या कष्टाचं सकारात्मक फळ त्यांना मिळवून देन, याला मी नेतृत्व समजतो. त्याच नेतृत्वाची कमी आपल्याला जाणवतेय. भाषण देता येन कला आहे, आणि मुळात म्हणजे आपला समाजहि कलाप्रेमी आहे. कलेची वाहवा मोकळ्या मनाने आपण नेहमीच केली आहे. पण कलेचा उपयोग जेव्हा हिंसा करण्यासाठी वापरला जातो, तेव्हा ती कला उरत नाही.

रूपसंपदेची महती प्रेमरंगातच प्रतीत होते असे नाही, रुक्ष राजकारणावरही ती आपला प्रभाव पाडत असते. कधी कळत, कधी नकळत. हि गोष्ट मग जवाहरलाल नेहरूंच्या बाबतीत घ्या नाही तर सुभाषचंद्र बोसांच्या. नाहीतर सध्याचच म्हणाल तर राहुल गांधीच्या बाबतीत. अस असेल तर ४३ वर्षाच्या मनुष्यालाहि आपण तरुण म्हणण्यास कमी करत नाही, नाही का?

कृतज्ञता - गिरीश


पोर खाटेवर मृत्युच्याच दारा
कुणा गरीबाचा तळमळे बिचारा
दूर आई राहिली कोकणात,
सेविकेचा आधार एक हात !

ताप त्याने भरताच तडफडावे.
पाखराने एकले तडफडावे.
हळू गोंजारी सेविका दयाळू
डॉक्टराचे वच शंतवे कृपाळू.

कधी त्याने घ्यावे न मुळी अन्न
कुठे डोळे लाउन बसे खीन्न
आणि डाक्टर येताच गोंजाराया
हाय! लागे तो घळघळा रडाया !

एक दिन तो व्याकुळ फार झला
आणि पुसिलेच त्याने डाक्टरला
''आता दादा, मरणार काय मी हो?''
तोच लागे अश्रुची धार वाहो!

ह्रदय हलूणी डोळ्यात उभे पाणी
तरी डाक्टरची वदे करूण वाणी
दोन गोष्टी सांगून धीर देई
पुन्हा गोंजरून शांतावुन जाई.

रात्र अंधारी माजली भयाण
सोसवेना जीवास आता ताण
हळूच बोलावी बाळ डाक्टराला
तोही धर्मात्मा धाऊनीच आला.

आता बाळाला टोचणार तोच
वेड वासून पाखरू दीन चोच
"नको आता ! उपकार फार झाले!
तुम्ही मजला किती..गोड..वागविले!

भीत..दादा..मरणास मुळी..नाही!
तू..म्ही..आई..!!" बोलला पुढे नाही!
क्षणी डोळे फिरविले बालकाने
आणि पुशिली लोचणे डाक्टराने.

-

कवी : गिरीष

Sunday, 9 March 2014

लग्न, वाजंत्री, कहर

लग्न...मागच्या एका पोस्टमधेही मी याबद्दल लिहिलंय, की आपल्या समाजात ज्या गोष्टींना गरजेपेक्षा जास्त महत्त्व मिळालेलं आहे. माझा लग्नाच्या प्रथेसंबंधी राग असण्याची अनेक करणे आहेत. आमचं घर अगदी गावातल्या मुख्य रस्त्याला लागून आहे, आणि मुख्य म्हणजे घराच्या आजूबाजूला तीन मंगल कार्यालय, त्यातल्यात्यात एक अगदी घराला लागून. गावातल्या प्रसिद्ध दत्तात्रेयाच्या मंदिरापासून वरातीस सुरवात होते. आमच्या घराच्या डाव्या बाजूस मंदिर आणि बाकी सर्व विवाह मंगल कार्यालये उजव्या. त्यामुळे ज्याही वराती जातात त्या आमच्याच घरावरून. तुम्हाला कल्पना यावी यासाठी खाली हे चित्र काढलय. 



त्यात हे वाजंत्रीवाले म्हणजे कहरच. जर कधी मोठी लग्नतिथी असेल तर मग दोन ते तीन तास आमचं संपूर्ण घर ह्या वाजंत्रीच्या आवाजाने दणाणून सुटतं. पूर्वी ७-८ वर्षांपूर्वी DJ हा प्रकार अस्तित्वात नव्हता, त्याचा शोध म्हणा किंवा सार्वजनिक कार्यात वापर म्हणा, हा काळाच्या दृष्टीने उशिराच झाला तेच काय ते आमचं सुदैव. इयत्ता २री पासून ते १२वी पर्यंत सर्व परीक्षा मी ह्या वाजंत्रीच्या आवाजातच अभ्यास करून दिल्या आहेत. कारण ह्या लग्न समारंभांचा मुख्य मौसम म्हणजे डिसेंबर आणि नंतर मार्च ते जून ह्या काळातला. पहिले मी फार चिडायचो, प्रथम त्या लग्नात आनंदाने नाचनार्यांवर आणि नंतर घरातल्या मंडळींवर, की त्यांना हीच जागा सापडली होती घरासाठी? पण करणार तरी काय...वडील डॉक्टर, त्यामुळे मुख्य रस्त्याला लागून क्लिनिक आणि त्यामागे घर. पण नंतर नंतर मला सवय झाली, लग्नाच्या वराती घरावरून जात असताना सुद्धा माझ लक्ष विचलित होणं बंद झालं. याला तुम्ही एकाग्रता म्हणा किंवा सवयीचा परिणाम म्हणा, पण एकदाची सवय झाली.

लहानपणी टिळक जयंतीला एक टिळकांच्या जीवनावरील कथा म्हणून आमच्या शाळेत एक कार्यक्रम होता, त्यात एक टिळकांच्या एकाग्रतेवर गोष्ट ऐकली होती की त्याचं वाचनात इतके मग्न होत की घरावरून वाजंत्री गेली तरी त्यांचे त्याकडे लक्ष जात नसे. ही गोष्ट ऐकल्यानंतर मला काही स्वतःचा वेगळाच अभिमान वाटला होता.
मला तर स्वतःच्या लग्नात ब्राह्मणाला बोलावण्याची मुळातच गरज वाटत नाही. कारण रोजरोज ऐकून ऐकून माझ्या ती सर्व स्तोत्र-मंत्र पाठ झाली आहेत. अगदी कोणत्या क्षणाला अग्निकुंडात तूप टाकायचं, मामांना बोलावून अंतरपाट पकडायला लावून मंगलाष्टक म्हणण्यापासून, कण्यादानापर्यंतची सर्व विधी मला तोंडपाठ आहेत. अगदी हाडाचा ब्राह्मणही इतक्या लकबीने म्हणणार नाही इतक्या वाकबगार पद्धतीने मी म्हणू शकेन, याचा मला आत्मविश्वास आहे.

लग्न कार्याबद्दल आणखी एक विचित्र गोष्ट म्हणजे लग्नात जेवण द्यायचं आणि त्याचा खर्चही घ्यायचा. प्रथम मुलीवाल्यांनी हुंडा द्यायचा आणि लग्नकार्य लावण्याचीही जबाबदारीही त्यांचीच. आणि मुलवाल्यांनी यायचं आणि एक टेबल-खुर्ची लावून ‘आहेर’ म्हणून पैसे गोळा करायचे. जर नंतर पैसे गोळा करायचेच असतात तर पहिले पैसे उडवायचेच कशाला? याचं उत्तर मला काही अजून सापडलेलं नाहीये. नवरदेवाकडच्या काही म्हाताऱ्या मंडळींचं मुख्य कार्य म्हणजे लग्नात काही त्रुटी राहिल्या आहेत का आणि मानपानाची नीट व्यवस्था झालीय का ते पाहणं. मानपान म्हणजे लग्न गाड्या आल्याबरोबर त्यांच्या फराळाची नीट व्यवस्था आहे की नाही?(प्रवासचा प्रचंड थकवा आलेला असतो ना!) ज्यांचा उपवास आहे त्यांची वेगळी व्यवस्था आहे की नाही? गर्मीचा मौसम असेल तर काही थंड म्हणजे सरबत वैगरे आहे किंवा नाही? या आणि असल्या एक नाही अनेक गोष्टी. त्या जर चुकून नसतीलच तर त्या का नव्हत्या याचं विश्लेषण करणं. आणि जर त्या असतील तर त्यावर पर्याय न काढता त्या फुकट लग्नाच्या पहिल्या पंगतीत खाऊन आलेल्या शक्तीने चारचौघात बोभाटा करणं.

आमच्या घराजवळ एक मंगल कार्यालय आहे, त्याच्या मालकाची एक गमतीदार कहाणी आहे. इमानदारी म्हणून जी गोष्ट असते त्याचे अतिशय निर्मळ उदाहरण. ते मंगल कार्यालयाबरोबरच  स्वयंपाकी आणि वाढपीसुद्धा पुरवतात. तेच स्वयंपाकी लोक प्रत्येक पदार्थ एक-एक कढई भरून त्यांच्या घरी पोहोचतं करतात. जर यापुढे तुम्ही लग्नाच्या पंगतीत बसले असाल आणि कोणताही पदार्थ जर कमी पडला तर स्वयंपाक घराची तपासणी करायला विसरू नका. आणि जर तुम्ही नवरदेवाकडून असालं आणि जर हा प्रकार तुमच्या लक्षात आला तर तारसुरात खडसवन्यास बिलकुल कमी करू नका, कारण अहो दादागिरी हा तर मुलाकडच्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे, नाही का?

Friday, 21 February 2014

पुत्र ऐसा देगा देवा...



आपली कमतरता लक्षात घेईल इतका सामर्थ्यशाली,
भयप्रद परिस्थितीतस्वतःचा सामना करेल इतका धैर्यशाली,
जो प्रामाणिक पराभव स्वीकारताना झुकणार नाही किंचितही;

जो दिग्विजय नम्रतेने स्वीकारताना उतणार नाही, मातणार नाही,
जगही इच्छापूर्ती करताना ज्याच्या पाठीचा कना मोडणार नाही;
जो सदैव शाबूत असेल;
तुझं अथांग स्वरूप जाणून घेताना आत्मज्ञान करून घेणं
हि ज्ञानाची पहिली पायरी आहे, हे ज्याला माहित असेल;

नेऊ नकोस त्याला तू सुखी-समाधानी सुटसुटीत सरळ मार्गावर,
दे असा मार्ग त्याला संकट, खाचखळगे, आव्हानं ठायीठायी ज्यावर.
इथेह शिकू दे त्याला भोवंडून टाकणाऱ्या वादळाशी सामना करायला
आणि पराभवान खचलेल्यानविषयी अथांग करून दाखवायला.

ज्याच अंतकरण विशुद्ध असेल, ज्याची आकांक्षा उत्तुंग असेल,
दिग्विजयी होण्याच स्वप्न पाहण्यापूर्वी जो स्वतःवर विजय मिळवेल;
मनमोकळ खळाळून हसने शिकाल्यावरही 
ज्याला अश्रू धाळयची लाज वाटणार नाही;
भविष्याचा वेध घेत स्वप्न रंगवतानाही 
ज्याला भूतकाळाच विस्मरण होणार नाही.

एवढ सर्व मिळाल्यावर माझी प्रार्थना आहे 
जगाचा गांभीर्यान विचार करताना 
स्वतःविषयी अतीगंभीर न होण्यासाठी
त्याला विनोदबुद्धीच सामर्थ्य दे.

थोरपणाची जबाबदारी पेलताना 
थोरपानातलं साधेपण लक्षात ठेवण्यासाठी,
ज्ञानी असताना दुराग्रही न होण्यासाठी 
सामार्थ्यातली सेवातत्परता लक्षात ठेवण्यासाठी 
त्याला विनयाच वरदान दे.

असं सगळ झाल तर, मी, त्याचा पिता,
"माझ आयुष्य सार्थकी लागल,
असं पुटपुटायच धाडस करेन."

Wednesday, 19 February 2014

शिवजयंती



मी ८वी मधे असताना शिवजयंतीच्या दिवशी दिलेलं हे भाषण. घरी आलो असताना अचानक सापडलं. तेच आज इथे post करतोय.

दिल्लीच्या मुघल सत्तेला हादरा देऊन स्वतंत्र मराठी राज्याची स्थापना करणारे शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी मानसाचं मर्मस्थळ आहे, मानबिंदू आहे. त्यांनी आपल्या अतुलनीय पराक्रमाने दिल्लीचे मुघली तख्त हादरवून सोडले व स्वतंत्र हिंदुपतपातशाही निर्माण केली. त्यांच्या ह्या अतुलनीय पराक्रमाची दखल दिल्लिअधिपतिलहि घ्यावी लागली.
ज्या काळी मराठी मातीत सर्वत्र मुर्दाड आणि नि:सत्ववातावरण निर्माण झालं होत, पारतंत्र्य आणि गुलामगिरीविरुद्ध कोणाला आस्था वाटत नव्हती. स्वातंत्र्य गमावल्याबद्दल खेद नव्हता, भूमिपुत्रांना मुस्कटदाबी सहन करावी लागत होती, ‘अस्मानी’ आणि ‘सुलतानी’ला तोंड देत देत रयत पिचली होती, आणि आजचं मरण उद्यावर ढकलत होती. ज्या जनतेला पूर्वी अश्वमेधाच्या घोड्याच्या तपांचा आवाज ऐकण्याची सवय होती, तीच जनता आता घोड्याच्या तपांचा आवाज ऐकताच बिचकत होती. भेदरलेल्या कोंबड्यानसारखी अवस्था झाली होती त्यांची...मरण येत नवत म्हणून जगात होती. मराठी मुलाखतील या प्रस्थापिताला उलथून टाकण्यासाठी जिजाऊनी स्वराज्याविचारांचा पुरस्कार केला आणि शिवरायांच्या द्वारे अमलात आणला.

इतिहासाच्या कालपाटलावर ज्या स्री व्यक्तिमत्त्वांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे, त्यात अग्रभागी असणार नाव म्हणजे जिजाऊ. सिहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य जीजाऊनच्या सावलीत आकारास आलं, हे लक्षात घेतलं की जिजाऊनच्या स्वराज्याकार्याची उंची जाणवते.

शिवरायांनी लहानपणापासून या पिचलेल्या, नडलेल्या रयतेच निरीक्षण केलं. त्यांनी पाहिलं की यांच्यातल पुरुष जरी सुस्त पडलेले असलं तरी संपलेलं मात्र नाही. शिवरायांनी त्यांच्या मनात क्षात्रतेजाचं बीज रोवलं, त्यांच्या सत्त्वाला फुंकर घातली. बारा मावळ फिरून त्यांनी मावळ्यांची फौज उभारली आणि तोरणा जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ केली. त्या भयाण अंधार्या पारतंत्र्यात जगात असलेल्या रयतेच्या मनात स्वातंत्र्याच स्फुल्लिंग चेतवून क्रांतीचा भडका उडवून दिला.त्याचीच परिणीती म्हणजे स्वराज्य! हे मावळे काही पैसे कमावण्यासाठी हा स्वराज्य उद्योग करीत नव्हती तर स्वराज्यविचाराने शिवरायांच्या नेतृत्वाखाली ते एकत्र जमले होते.

संस्कृतमधला एक रसराज कवी पंडित जगन्नाथ त्याचवेळी दिल्लीदरबारात काम करत होता. त्याला जयपूरच्या हिंदू राजाने आपल्याकडे बोलावले तेव्हा त्याने निरोप पाठवला, “दिल्लीश्वरो वा जगदिश्वारो वा मानोरथान पुरायीतुं समर्थ:!” म्हणजे माझे मनोरथ पूर्ण करणारे दोघेच आहे –एक परमेश्वर आणि दुसरा दिल्लीश्वर! बाकी हे भिकारडे राजे मला काय देणार? हा प्रश्न न विचारणारे मावळे शिवरायांनी जन्माला घातले.

शिवछत्रपती जाज्वल्य धर्मनिष्ठ हिंदू होते हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्च आहे. मात्र त्यांनी आपलं धर्म कधी हिंदू धर्मांतर्गत ब्राम्हणी कर्मकांडात, रूढी परंपरेत, अज्ञानाच्या गर्तेत अडकू दिला नाही. इस्लाम धर्माचा त्यांनी कधी द्वेष केला नाही. त्यांनी जातपात, धर्म कधी पहिला नाही तर त्यांनी स्वराज्याप्रती फक्त निष्ठा पहिली. असा उदात्त विचार मध्ययुगात देणारे ते एकमेव महापुरुष होते.

महाराजांनी हिंदूंचे अतिरिक्त लाड कधी केले नाहीत आणि अल्पसंख्य या गोंडस नावाखाली कोणाला डोक्यावरही बसवले नाही. ज्यांच्यात कर्तुत्व असते ते लपून राहत नाही; त्यांना अल्पसंख्यांच्या पडद्याआडून पुढे जाण्याची गरज नसते, हे महाराजांनी ओळखले होते.

छत्रपतींनी हे सगळे करीत असताना आपल्या परंपरेवर प्रेम केले, आणि परंपरेतल्या दोषांचा त्यांनी नयनात केला. आपल्या परंपरेमध्ये धर्मांतर झालेल्यांना परत हिंदू धर्मात घेता येत नाही, असे म्हणणारे धर्ममार्तंड होते. मात्र शिवरायांनी ह्या प्रथेचा बिमोड केला. कवी भूषण यांनी शिवरायांचे वर्णन करताना म्हटले आहे,

“कासिहुकी कला गयी| मथुरा मस्जीद भइ|
अगर न होते सिवाजी| तो सुन्नत होती सबकी|”


भावनांच्या जोरावर राज्य चालत नसतात तर त्या बरोबर त्याला कर्तृत्वाची किनार लागते. महाराजांनी स्वराज्याविषयी मावळ्यांमध्ये प्रेम तर निर्माण केलेच मात्र स्वता:ही प्रत्येक लढाइत अग्रभागी राहिले. शाहिस्तेखानाची फजिती, दिल्लीदाराबारातून सुटका, पन्हाळ्याचा वेढा, पुरंदरचा वेध यांसारख्या संकटांची मालिकाच त्यांपुढे उभी होती. मात्र प्रत्येक संकटात महाराज धीरोदात्त पर्वतराजाप्रमाणे निश्चल, स्थिर राहिले.

दृढ स्वराज्याविचार-संकल्पक, कर्तव्यदक्ष प्रशासक, थोये मुत्सद्दी, राजकारण दुरंधर, उत्तुंग कार्यकर्तृत्व आणि मानवतावाद...या त्यांच्या उठून दिसणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे स्वाभिमान आणि करारी बना हे रुपेरी पदर आहेत. स्वजन, स्वधर्म, स्वलोक व स्वाभिमान शिवबांनी कधीही सोडला नाही.त्यांनी कधीहि हे स्वराज्य शिवाजीचे म्हटले नाही तर नेहमीच शाम्भूम्हादेवाचे म्हटले यावरून त्यांची नम्रता दिसून येते.

शिवाजी महाराज धर्मसंस्थापक राजे होते आणि म्हणून त्यांनी संपूर्ण जीवनात कुठल्याही जीवनमुल्यांची अवहेलना केलेली दिसणार नाही. म्हणून त्यांची तुलना सिझरशी , नेपोलीयनशी किंवा लेनिनशी करताच येणार नाही . तुलना करायचीच झाली तर केवळ भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्याशीच करावी लागेल. तिसरे नाव मला सापडत नाही. शिवजयंतीच्या या पावन पर्वामध्ये आपल्या अंतरंगामध्ये त्या शिवाजीला जन्म देवूया आणि शिव्छत्रपतींना ह्रिदयसिंहासनावर बसवूया. ज्याने या काळोखाचा भेद केला आणि पुढे कित्येक शतके नव्हे तर कित्येक सहस्रके पुरेल असे दिव्या जीवन आपल्यासमोर ठेवले.

“हे हिंदुशक्ति संभूत दीप्ततम तेजा
हे हिंदू तपास्यापुत ईश्वरी ओजा|
हे हिंदुश्री साम्राज्याभूतीच्या राजा,
हे हिंदुनृसिंहा नमो शिवाजी राजा
तुज नमो नमस्ते| नमो शिवाजी राजा|

नमो शिवाजी राजा|”
जय भवानी! जय शिवाजी!


~दिग्विजय पाटील.