Pages

Monday 10 March 2014

उपहास

भारतात ३ उत्सव फार मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात - लग्न,वर्ल्डकप क्रिकेट आणि निवडणुका. त्यातल्यात्यात निवडणुकांचा वारा लागताच आपली जनता बेभान होते. एरवी शांत असणारी, कोणत्याही बाबतीत जे चाललंय तेच चालू देणारी, बदल ह्या शब्दालाही घाबरणारी मंडळी निवडणुका येताच त्यांच्यात एक निराळच चैतन्य दिसून येत. कदाचित तेच चैतन्य संचारल्यामुळे मी हे लिहतोय.

राजकारणात नेहमीच असे घडत आले आहे - संघर्ष वरकरणी दिसतो वैचारीक, तसा तो काही प्रमाणात असतोही. त्याचबरोबर त्याला वैयक्तिक रागलोभाचेही परीणाम लाभलेले असतात. नव्हे, मुळात तोच त्याचा गाभा असतो. कोणी त्याची कबुली देत नाही, इतकेच काय ते.




महाराष्ट्राच्या राजकारणात ह्या ठळक ओळींना काही विशेषच महत्त्व आहे. काही वेगळी विचारधारा घेऊन राजकीय पक्ष जन्म घेतात, हि आता वेडगळ समजूत झालीय. स्वतःच्या वैयक्तिक महत्वाकांक्षांचे पंख पसरवण्यासाठीही ते जन्म घेतात, मात्र त्याच बाबतीत आपली गल्लत होते. आणि काही काळाने कळत की ज्याला आपण नवी आशा म्हणून पाहत होतो, तोही राजकारणाच्या सरबतात विरघळलाय. मात्र हे समजण्यापूर्वी फार उशीर झालेला असतो.

अमेरिकेच्या राजकारणात पहा, तेथे दोनच पक्षाचं वर्चस्व आहे- डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन. किंवा इंग्लंडमधेही पहा- conservative unionist आणि labour पक्ष. भारतात सर्वात मोठा प्रश्न हा आहे की सत्तेसाठी आवश्यक निम्म्याहून अधिक संख्याबळ जमवण कोणत्याही एका पक्षाला शक्य नाही. मग ते मिळवण्यासाठी अतिशय विरुद्ध विचारधारणा असणारे पक्ष एकत्र येतात, आणि राजकीय संतुलन ढळत. राजकारण विचारधारेपासून व्यक्तीत्वाकडे जेव्हा कलणं सुरु करतं तेव्हा ते राजकारण उरत नाही, तेव्हा ते बनत सत्तारूढ होण्यासाठी इच्छुक व्यक्तींचा आपापसातील संघर्ष.

परिस्थितीवर स्वार होण्यासाठी अहंमन्य नेत्यालाही आपली पहिली कार्यशैली सोडून द्यावी लागते.हि सुध्दा गोष्ट प्रामुख्याने दिसून येते. एकेकाळी कुणा एका समूहाचे रक्षणकर्ते म्हणवणारे, मतदाराचा कल पाहत निवडणुकीपूर्वी आपल्या भूमिकांना U-टर्न देतात. अहो पण घोषणापत्रात(manifesto) तुम्ही काहीही लिहील तरी माणूस बदलतो काय? मानसन्मान मिळवण्यापेक्षा समाजाच्या आदरास पत्र होण अधिक श्रेयस्कर असतं, हे हि मंडळी विसरतात. सत्ताअभिलाषा किंवा राज्यतृष्णा मनुष्याला आंधळ करते हि म्हण काही खोटी नाही.

भावना भडकावणारी भाषणं करण किंवा मोर्च्याच्या अग्रभागी असणं म्हणजे नेतृत्व नव्हे, तर त्या भाषणाचा किंवा त्या मोर्च्याचा उद्देश निर्मळ असणं आणि ज्या लोकांची उर्जा त्या गोष्टीसाठी खर्च होतेय त्या लोकांच्या कष्टाचं सकारात्मक फळ त्यांना मिळवून देन, याला मी नेतृत्व समजतो. त्याच नेतृत्वाची कमी आपल्याला जाणवतेय. भाषण देता येन कला आहे, आणि मुळात म्हणजे आपला समाजहि कलाप्रेमी आहे. कलेची वाहवा मोकळ्या मनाने आपण नेहमीच केली आहे. पण कलेचा उपयोग जेव्हा हिंसा करण्यासाठी वापरला जातो, तेव्हा ती कला उरत नाही.

रूपसंपदेची महती प्रेमरंगातच प्रतीत होते असे नाही, रुक्ष राजकारणावरही ती आपला प्रभाव पाडत असते. कधी कळत, कधी नकळत. हि गोष्ट मग जवाहरलाल नेहरूंच्या बाबतीत घ्या नाही तर सुभाषचंद्र बोसांच्या. नाहीतर सध्याचच म्हणाल तर राहुल गांधीच्या बाबतीत. अस असेल तर ४३ वर्षाच्या मनुष्यालाहि आपण तरुण म्हणण्यास कमी करत नाही, नाही का?

No comments:

Post a Comment