Pages

Tuesday 11 March 2014

चूक की अनुभव?



जग चुकते, त्या चुकीविषयी ऐकते, पण शिकत मात्र नाही! प्रत्येक मनुष्य आयुष्याच्या शेवटी शहाणा होतो, पण तो दुसर्याला लागलेल्या ठेचांनी नाही तर स्वतःला झालेल्या जखमांनी!

तसं पाहिलं तर आयुष्य फार छोटं आहे जगातल्या सर्वच चुका स्वतःच करण्यासाठी आणि त्यातून शिकण्यासाठी. जी मानसं दुसर्याच्या ठेचांनी शिकतात, ती शहाणी ठरतात आणि जी म्हणतात की, 'स्वतःच्या अनुभवातून आलेलं ज्ञान सर्वश्रेष्ठ' ती अंगभर अनुभवाच्या जखमा घेऊन वावरतात.

'चुकांमधून अनुभव' हा शब्दच मुली मला स्वतःची समजूत काढण्यासाठी मढवलेला वाटतो , कारण त्याच्याशी जोडलेल्या असतात वाईट आठवणी. जीवनातल्या वाईट प्रसंगांना 'अनुभव' हे गोंडस नाव देऊन तेवढाच आपण मनाला दिलासा देण्याचा प्रयत्न करतो.

मला सांगा कितीतरी मानसं आपल्या 'अनुभवातून' शिकून त्याच चुकीची पुनरावृत्ती करत नाहीत? फार क्वचित मानसं हो! बाकी लोकांच संपूर्ण आयुष्याच 'अनुभवांनी' भरलेलं असतं.

वेळ निघून गेल्यानंतर आलेल्या शहाणपणाची किंमतच मुळी फार कमी असते आणि जी थोडीफार असते, तिचा उपयोग तेव्हाच जेव्हा पुढच्या वेळी आपण तिचं स्मरण ठेवतो.

आपण फार विसराळू आहोत हो! कालांतराने विसरतो गोष्टी. पण चुकांना 'अनुभव' नावाचा सन्मान मिळवून द्यायचा असेल तर विसराळू होऊन काम कसे चालेल?

लहानपणपासून मनावर बिंबवल जातं की वाईट गोष्टींना विसरा, चांग्ल्यावर लक्ष केंद्रित करा. मात्र काही चांगल होण्याची अशा बाळगत असाल तर वाईट गोष्टींमधून जो 'पाठ' घेण्याची आपण मनाला तात्पुरती दिलेली समजूत असते ती तात्पुरती ह्या सदरातून आपल्याला वगळायला हवी, नाही का?

~दिग्विजय पाटील.

No comments:

Post a Comment